पावसाळ्यात अग्नी मंद आणि बाहेर थंडावा असल्याने चमचमीत अन् मसालेदार पदार्थ खायची इच्छा होते अन् खाल्लेही जातात. हे पदार्थ पुष्कळ अतीप्रमाणात खाल्ले जाणार नाहीत, हे बघावे.
व्यायाम कमीच करावा. साधारणपणे काखेत आणि कपाळावर थोडा घाम आला की, व्यायाम थांबवावा. पावसाळ्यात शारीरिक शक्ती न्यून असल्याने व्यायामाने वात अधिक वाढू शकतो.